अक्षरलेणी | AKSHARA FOUNDATION OF MARATHI LETTER

AKSHARA FOUNDATION OF  MARATHI LETTER  प्रत्येक मनुष्य, स्त्रीपुरुष उपजत ज्ञानी असतो. ज्याच्या त्याच्या आकलण क्षमतेनुसार-बुध्यांकानुसार जो तो ज्ञान ग्रहण करतो. दैनंदीन व्यवहारात ज्ञानाची गरज सर्वानाच भासते. 

AKSHARA FOUNDATION OF  MARATHI LETTER
AKSHARA FOUNDATION OF  MARATHI LETTER
                                                
अनेक काळांनुसार ज्ञानाच्या व्याख्या बदलल्या असतील मात्र ज्ञान ज्ञानच आहे. 

AKSHARA- FOUNDATION OF  MARATHI LETTER


पूर्वी वनांत आश्रम करून राहणारे ऋषी मुनी ज्ञानदान करायचे व ते ऋषींची मुलें, राजपुत्र, प्रधानपुत्रांना ज्ञान द्यायचे महाकारुणीक भगवान गौतम बुद्धांनी स्वअध्ययन चिंतन करून लोकांच्या दुःखांच हरण - नाश करणार ज्ञान संपादन करून ते सर्व जगाला, समाजातल्या सर्व स्त्री पुरुष अबालवृद्ध  'AKSHARA FOUNDATION OF  MARATHI LETTER' सर्व जातीधर्मांतल्या लोकांसाठी अमर्याद मुक्त- खुल करून देऊन परोपकार केले व थोर संस्कृती उदयास आणली. 

त्यांनी प्रकट केलेल्या धम्म ज्ञानाचा सर्वत्र प्रचार प्रसार त्यांनी केला. त्या ज्ञान ग्रहणान लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन झाल. पारंपरिक अज्ञान अंधश्रध्दा दुर्व्यसनांपासून ओक अलीप्त झाले संघटीत होऊन सुखी झाले. त्यांनी उदयास आणलेली धम्माच्या ज्ञानाची परंपरा संस्कृती आजही करोडो लोक निष्ठेन जोपासत आहेत. महाराष्ट्रातही त्याची पाळमुळे खोलवर रुजलेली आहे. 

AKSHARA OF  MARATHI LETTER

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातर करून बुद्ध धम्माचा स्विकार केला व लाखो समाजबांध वांना धम्म प्रवाहात आणून संस्कृतीची जोपासना केली.

संस्कृत भाषेत स्तिमीत असलेल व गुरू शिष्य परंपरेन जोपासले जाणार अध्यात्म गुहय ज्ञान सेत ज्ञानेश्वरांनी गितेवर भाष्य करून ज्ञानेश्वरीद्वारा मराठीत प्रगट करून ते सर्वांसाठी खुल केल. संत नामदेव, चोखा मेळा. कान्होपात्रा, जनाबाई, बहीणाबाई तुकाराम महाराज रामदास स्वामी अशा अनेकांनी अभंग रचनांतून लोकांना ज्ञानाचा उपदेश केलेला आहे

अजुनही ते अभंग लोक आदरान पठण गायन करतात. त्यात मन:शांती सन्मानही मिळतो. महाराष्ट्र संस्कृतीत दुसऱ्या तिसऱ्या शतकात हल राजांनी मोठा खर्च करून लाखो कवितांचा संग्रह केला होता. सुमारे साडे आठशे वर्षांपूर्वी मराठीतले आयकवी मुकुंदराज यांनी मराठी भाषेत काव्य लिखाण केल होत. 

ती परंपरा पुढे अनेक कविनी जोपासली जी आजलगायतही अबाधित आहे. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकारामांची अभंग गाथा, एकनाथांच भागवत, भारूड, अभंग, केशीराजांच्या कविता, दासोपंतांची पासोडी, रामदासांचा दासबोध, म्हाई भटांच्या रवळो, मुक्तेश्वर, महीपती, चोखामेळा, शेख महंमद वामनपंडीत, रघुनाथपंडीत, मयूरपंत, अशा अनेक थोरांनी अभंग काव्य ग्रंथांतून  AKSHARA FOUNDATION OF  MARATHI LETTER साहित्य संस्कृतीची निष्ठेन जोपा सना केली आहे. प्रभाकर राम जोशी, होनाजी बाळा अनंत फंदी, अण्णा भाऊ साठे व अनेकांच्या महाठी लावण्या अनेक शाहीरांचे पोवाडे, महीपतींचे चरित्र ग्रंथ, दास गणूंचे चरीत्रग्रंथांतून मराठीच्या संगोपनाच मोल कळत.

 त्यानंतरही अनेक कवी साहीत्यीकांनी त्या त्या काळानुसार साहीत्य निर्माती केलेली असली तरी ती एखादया अथांग जलाषयांसारखी आहे. त्या काळातील रसीक जनांची रुचीची आवड जोपासून पुढील अनेक पिढ्यांसाठी ज्ञानार्जना च कार्य करत आहेत.

AKSHARA-MARATHI LETTER

खान्देशातील जळगांवच्या थोर कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच जीवनचरित्र आणि त्यांच काव्य म्हणजे संस्कृतीच विद्यापीठ त्यांच्या काव्यान मराठी साहीत्यात जागतीक दर्जा प्राप्त केलेला आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिलेल त्यांच नाव त्यांच्या शब्द वैभवाची प्रत्यक्षात साक्ष आहे तसच महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मानव संस्कृतीची केलेली जोपासना हीदेखील संपूर्ण जगाला सतत प्रेरणा देणारी आहे. 

पुणे विद्यापीठाने त्यांच्या योरपणाला शिरावर घेऊन त्यांच्या संस्कृतीवर्धक कार्याचा सन्मान जोपासला आहे.

राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड़ कर्मवीर भाऊ- राव पाटील, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ बाबा आमटे,  'AKSHARA FOUNDATION OF  MARATHI LETTER" अशा अनेक थोर विभूतींनी आपल्या स्वआचरण, समाजप्रेरक थोर वर्तमान संस्कृतीच्या संगोपन संवर्धनात मोलाच योगदान दिलेल आहे.
लेखक- डॉ. ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या