वारी - पंढरीची | Pandharichi vari in marathi

Pandharichi vari in   पंढरीचा पांडुरंग परमात्मा - विठूराया हे महाराष्ट्राच आराध्य दैवत. संपूर्ण महाराष्ट्र त्या सावळ्याच्या भक्तीत रंगून जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या पंढरपुरात लोक भाव भक्तीने दर्शनाला येतात. 

Pandharichi vari in marathi
 Pandharichi vari in marathi

                                             

आज आपण पंढरपू ची वारी व विठूरायचे दर्शन यावर जाणून घेऊ

Pandharichi vari in marathi

पंढरीचा पांडुरंग परमात्मा - विठूराया हे महाराष्ट्राच आराध्य दैवत. संपूर्ण महाराष्ट्र त्या सावळ्याच्या भक्तीत रंगून जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या 'Pandharichi vari in marathi' पंढरपुरात लोक भाव भक्तीने दर्शनाला येतात.

 पंढरीचा पांडुरंग परमात्मा - विठूराया हे महाराष्ट्राच आराध्य दैवत. संपूर्ण महाराष्ट्र त्या सावळ्याच्या भक्तीत रंगून जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या पंढरपुरात लोक भाव भक्तीने दर्शनाला येतात.

आषाढी कार्तीकीला तर लाखो भावीक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणी इतर भागांतूनही श्रध्देन येतात. पूर्वी कोणत्याही वाहनांची उपलब्धता नव्हती तेव्हा श्रध्दाळू स्त्रीपुरुष पायदळ येते होते तसच आजच्या आधुनीक विज्ञान युगात, वाहनांचे अनेक प्रकार व लाखोंची संख्या उपलब्ध असुनही लोक पंढरीला पायी चालत येतात हे विशेष

साधारणत: संत नामदेव आणी संत ज्ञानेश्वरादी भाषेडांच्या काळात म्हणजे बाराव्या शतकात वारीची प्रथा रूढ झाली त्यापुर्वीही वारी होती तरी या काळातच तीला खर स्वरूप प्राप्त झाल. 

Pandharichi vari


आषाढी एकादशीला आणी कार्तीकी एकादशीला आपल्या गावांतून पायदळ चालत आणि मुखाने हरीनामघेत, हातात टाळ वाजवून, खाद्यावर भगवी पताका घेऊन, गळ्यात तुळशीची माळा, कपाळाला गोपीचंदना चा टिका लावलेले भाधिक शेकडो हजारोंच्या संखेने रामकृष्ण हरी चा  Pandharichi vari in marathi  गजर करत हे लोक स्त्री पुरुष मजल दर मजल, मार्गान करत पंढरपुरात येतात. दशमीला पंढरपुरात येवून विसावतात आणि आपल्या आवडत्या विठूरायाच दर्शन घेऊन धन्य होतात. कृतार्थ होतात. विठूरायाच्या दर्शनान त्यांना जन्माचे सार्थक झाल्याच आत्मीक समाधान होत.

वैशाख वद्य १३ ला संत गजानन महाराज शेगाव, जेष्ठ वद्य ७ मी ला संत तुकाराम महाराज देहू जेष्ठ वद्य ८ 'मी ला संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी, जेष्ठ शु. १५ संत मुक्ताबाई राम पालखी जळगाव अशा लांबच्या पालख्यांच आषाढी वारीसाठी प्रस्थान होत. प्रस्थानाचे वेळी स्थानीक ठिकाणी सोहळा साजरा होतो. 

संत एकनाथ पैठण ,संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर ,सोपानदेव सासवड, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत बहीणाबाई अशा अनेक संतांच्या पालख्या त्यांच्या गावांतून निघतात. सर्व पालख्या पंढरीत येतात तेव्हा सर्व पंढरपूर नगरी टाळ मृदुंगाच्या नादान दुमदुमून जाते. 

भगव्या पताका उंच उंच फडकतात. अबीर गुलालाचा गंध सर्वत्र दरवळतो. भजन किर्तनाचा गजर सर्वत्र ऐकू येतो. संपूर्ण चंद्रभागेच वाळवंट भक्तांच्या दाटीन गजबजत चंद्रभागेच स्नान करून विठूरायाच दर्शन घेऊन वारी सफल झाल्याच मानसीक समाधान मनात साठवून आणी विठ्ठलाच सावळ रूप डोळ्यात साठवून लोक आपल्या घराचा मार्ग अवलंबतात.
 

vari in marathi

आषाढी कार्तीकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही अस अनेक संतांनी वारीच महत्व आपल्या अभंगांतून केलेल आहे. अनेक संकटांवर मात करून संतांनी त्यांच्या वारसांनी वारीची परंपरा जोपासली आहे. संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन- देहावसाना नंतर त्यांच्या मुलांनी पंढरपुरला वारी न्यायच ठरवल मात्र काही अडचणी येत होत्या. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना आर्थीक सहकार्य करून थेट पंढरपूरापर्यंत जाण्या साठी संरक्षणही दिल होत. थंडी ऊन वारा पावसाची तमा न बाळगता भावीकांनी ही वारीची प्रथा जोपासली आहे. श्रद्धा भक्तीने, निष्ठेने हे व्रत सुरु ठेवलेल आहे

वारी ही काही फक्त पंढरपुरचीच मर्यादीत नाही तर अनेक देव देवता, संतांच्या समाधी स्थळांवरही वारी नेण्याची प्रथा पूर्वापारची आहे अहं वाघ्या, सोहं वाघ्या प्रेम नगरा वारी ।। सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी" मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी ।। संत एकनाथ महाराजांनी अस जेजूरीच्या खंडेरायाच्या वारीच महत्व आपल्या अभंगातून सांगीतलेल आहे.

प्रत्येक महिन्याच्या वद्य एकादशीला पंढरपूरात, आळंदीत, देहूत, त्र्यंबकेश्वरात, पैठणात, सासवडात, किंवा मुक्ताई नगरात अशा अनेक ठिकाणी भावीक स्त्री पुरुष श्रध्देन येतात. तसेच आपल्या गावा जवळच्या एखादया पवीत्र स्थानी जातात. 

संत गजानन महाराजच्या शेगावात, साईबाबांच्या शिर्डीत हजारो भक्त दर गुरुवारी व रोजच सतत येतात. काही घराण्यांत आपल्या कुळाचारा नुसार वारीची  "Pandharichi vari in marathi" परंपरा जोपासली जाते. अनेक लोक मिळेल त्या वाहनाने आपले कुलदैवत, कुलदेवांच्या दर्शनाला वारीला नियमाने जातात.

 त्यांच्या दर्शनान त्यांच समाधान होऊन तृप्त मनान पुन्हा वारीला येण्याची आशा बळावते. व पुन्हा वारीची ओढ लागते.
लेखक : ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या